Sunday, November 16, 2025

श्रमिकांचे महत्व...

 


श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आपले जीवन सुकर व सोपे झाले आहे. आहे . त्यांना जरी त्यांच्या श्रमाचे मूल्य कमी मिळते पण त्यांचे कार्य फारच महत्वाचे आहे.


श्रमिकांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. शेतीमध्ये, पशुपालनासाठी लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये. कारखान्यात मजूर नसले तर काहीच उत्पादन होणार नाही .बांधकाम करणारे सुद्धा मजूरच असतात. कालवे, बांधारे, पुल, रस्ते तयार करण्यासाठी मजूर गुंतलेले असतात. घरातली व समाजातील अनेक लहान-मोठी कामे करण्यासाठी श्रमिक झटत असतात.


मजुरांची स्थिती नेह‌मीच चांगली नसते. गावातल्या व खेड्‌यातल्या मजुरांना  त्यांच्या कामाची मजुरी पुरेशा प्रमाणात मिळत नाही.  मोठ्या शहरात त्यांना मजूरी जास्त मिळते पण येथे जगण्यासाठी त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. शहरातल्या कामगारांना मजुरांना अस्वच्छ वसाहतीत वस्तीत रहावे लागते. आपल्या मुलांना ते चांगले  शिक्षण पण देऊ शकत नाहीत. आजारपणात त्यांना चांगल्या आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत नाहीत त्यांना इलाजा अभावी  त्रास भोगावा लागतो.


 शासनाने मजुरांच्या कल्याणसाठी काही योजना चालू केल्या आहेत. गावातील मजुरांना गावातच काम मिळेल केली आहे. परंतु इतकेच पुरेसे नाही. सर्व श्रमिकांसाठी घरे , त्यांच्या मुलांचे शिक्षण ,त्यांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी ठोस कार्यक्रमांची आवश्यकता आहे.  मजुरांच्या श्रमाचा आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे .


 अबोली राम गवळी इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

Friday, October 10, 2025

खेळाचे महत्त्व

  खेळाचे महत्त्व

खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शरीर तंदुरुस्त, मन प्रसन्न आणि बुद्धी तीक्ष्ण ठेवण्यासाठी खेळ आवश्यक आहेत. “आरोग्य हेच खरे धन” हे आपण सर्वजण जाणतो, आणि हे धन मिळविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित खेळणे.

खेळामुळे शरीरात उत्साह आणि ताकद निर्माण होते. धावणे, उडी मारणे, बॉल खेळणे, कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांमुळे शरीरातील सर्व अवयव कार्यरत राहतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मन आनंदी राहते.

खेळ केवळ शरीरासाठीच नव्हे तर मानसिक विकासासाठी देखील महत्त्वाचे असतात. खेळातून सहकार्य, शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, सहनशीलता आणि संघभावना शिकता येते. जिंकण्याचा आनंद आणि हार मान्य करण्याची तयारी हे दोन्ही जीवनातील मौल्यवान धडे खेळातून मिळतात.

आजच्या संगणक आणि मोबाईलच्या युगात मुले बाहेरील खेळ विसरू लागली आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक समस्यांमध्ये वाढ होत आहे. म्हणूनच पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना खेळासाठी प्रोत्साहन द्यावे.


खेळ हा केवळ विरंगुळा नाही, तर आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया आहे. त्यामुळे दररोज काही वेळ खेळासाठी दिला पाहिजे.

“खेळा – आनंदी रहा, तंदुरुस्त रहा!”  

                                          श्रेयस बर्गे                                          इयत्ता सातवी 

शेतकरी नसता तर. .

 

शेतकरी नसता तर...

शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. तो दिवसरात्र शेतात घाम गाळून आपल्या पोटासाठी अन्न उगवतो. शेतकरी नसता तर आपण पोटभर अन्न खाऊ शकलो असतो का? नाही! म्हणूनच शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे.

शेतकरी नसता तर शेतात पिके उगवली नसती, धान्य, भाजीपाला, फळे, दूध, कापूस काहीच मिळाले नसते. शहरातील लोकांकडे पैसा असता, पण खाण्यासाठी अन्नच नसते. दुकानांत भाजी, धान्य, फळे यांचा तुटवडा निर्माण झाला असता. भुकेमुळे देशात अराजक निर्माण झाले असते.

शेतकरी आपल्या श्रमाने आपले पोट नव्हे, तर संपूर्ण समाजाचे पोट भरतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत तो कष्ट करतो. कधी पिकाला रोग येतो, तर कधी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे त्याचे नुकसान होते, तरीही तो पुन्हा नव्या आशेने शेती करीत राहतो.

आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या मेहनतीचे खरे मूल्य ओळखले पाहिजे. शेती हा व्यवसाय नव्हे, तर जीवनाचे सार आहे.


शेतकरी नसता तर आपले जीवन अशक्य झाले असते. म्हणूनच आपण सारे मिळून म्हणूया —

“शेतकरी हा देशाचा अन्नदाता, त्याच्याविना जीवन अशक्य!”.               

                                   अबोली गवळी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा. 

वृक्षारोपण काळाची गरज

  वृक्षारोपण  काळाची गरज

आजच्या आधुनिक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवाने अनेक क्षेत्रांत झपाट्याने प्रगती केली आहे. परंतु या प्रगतीच्या शर्यतीत मानवाने निसर्गाचे संतुलन मात्र विसरले आहे. शहरांचे विस्तार, रस्ते, कारखाने आणि घरांच्या वाढत्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड होत आहे. यामुळे पर्यावरण प्रदूषण, दुष्काळ, तापमानवाढ आणि पर्जन्यमानातील अनियमितता वाढली आहे. म्हणूनच आज वृक्षारोपण ही काळाची अत्यंत गरज बनली आहे.

झाडे ही निसर्गाची अनमोल देणगी आहेत. ती आपल्या जीवनाचे मूळ स्त्रोत आहेत. झाडांशिवाय मानवाचे अस्तित्वच अशक्य आहे. झाडे आपल्याला ऑक्सिजन, फळे, फुले, सावली, औषधे, लाकूड आणि इंधन देतात. ते वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात आणि हवा शुद्ध ठेवतात. झाडांमुळे पावसाचे प्रमाण वाढते, माती धूप होत नाही, तसेच नद्या व झरे कायम राहतात.

झाडांच्या तोडीमुळे पृथ्वीवरील तापमान वाढत आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ही समस्या गंभीर बनली आहे. यामुळे हिमनद्या वितळत आहेत, पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग म्हणजे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणे.

प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी झाड लावावे आणि त्याची जपणूक करावी. शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांनी एकत्र येऊन वृक्षारोपण मोहिमा राबवाव्यात. स्थानिक व जलसंधारणासाठी उपयुक्त झाडांच्या जाती लावाव्यात. फक्त झाडे लावणेच नव्हे तर ती टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.

झाडे आपल्याला केवळ पर्यावरणीय नव्हे तर मानसिक शांतीही देतात. हिरवाईकडे पाहून मन प्रसन्न होते, तणाव कमी होतो. त्यामुळे वृक्षारोपण हे केवळ निसर्गसंवर्धन नाही तर आरोग्य, आनंद आणि समृद्धीचे प्रतीक आहे.


आज पृथ्वीचे रक्षण करायचे असेल तर वृक्षारोपणाशिवाय दुसरा पर्याय नाही. आपल्यासाठी, आपल्या पुढील पिढ्यांसाठी आणि पृथ्वीच्या अस्तित्वासाठी झाडे लावणे व जपणे अत्यावश्यक आहे.

“झाड लावा, झाडे जगवा – पृथ्वी वाचवा, जीवन वाचवा!”


                                                 अबोली राम गवळी 

                              जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

Wednesday, October 8, 2025

आंतरराष्ट्रीय योग दिन..

 योग हा भारताचा प्राचीन वारसा आहे. शरीर आणि मन यांचा संतुलित विकास करणाऱ्या योगाचे महत्व खूप आहे. म्हणूनच 21 जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो.


2014 साली भारताचे  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिन साजरा करण्याची सकल्पना मांडली आणि ती स्वीकारली गेली. 21 जून 2015 पासून योग दिवस दरवर्षी साजरा केला जातो. शोग केल्याने आपले शरीर निरोगी राहते, मन शात राहते आणि एकाग्रता वाढते.


आजारापासून बचाव होतो. दररोज योग केल्यास शारीरिक व मानसिक तणाव दूर होतो. योग हा फक्त व्यायाम नाही तर एक जीवनशैली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालये, संस्था इ.ठिकाणी सामूहिक कार्यक्रम घेतले जातात. लोकाना योगाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रदर्शन, शिबिरे, मार्गदर्शन इ. कार्यक्रम आयोजित केले जातात.


आपण सर्वांनी रोज योग करणे व इतरांनाही प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. योग हे आरोग्याचे रहस्य आहे, त्यामुळे भारतीय संस्कृती मध्ये योगाला खूप महत्व आहे. आजच्या धावपळीच्या काळात आपण योगाच्या माध्यातून आपले शरीर आणि मन निरोगी ठेऊ शकतो..

संजना राठोड ..

इयत्ता 7 वी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर..

Tuesday, September 9, 2025

छत्रपती शिवाजी महाराज आधारित भाषण

 जगदंब जगदंब जगदंब 

 प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णुर्विश्व वंदिता शहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते... जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पड़ते भल्याभल्यांची मती अरे मरणाची कुणाला भिती ? आदर्श आमचे राजे शिवछत्रपती...


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण?

 छ- छत्तीस हत्तींचे बळ असणारे...

त्र- त्रस्त मुघलांना करणारे...

प- परत माघारी न फिरणारे...

ती- तिन्ही जग जाणणारे...

शी- शिस्तप्रिय...

वा- वाणिज तेज...

जी- जिजाऊंचे पुत्र...

म- महाराष्ट्राची शान...

हा- हार न मानणारे...

रा- राज्याचे हितचिंतक...

ज- जनतेचा राजा...

 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज...

 अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा...

 स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्यांला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही...

 विजयासारखी तलवार चालवून गेला... निधड्या छातीने हिंदुस्तान हरवून गेला... वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला... मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला... स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला... ॐ बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांचे बळ मिळते. एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लहर आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात पेटवली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटवली रानांगणे देह झिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोडो मावळे येते महाराजांवर हसत हसत कुरबान आहेत न चिंता न भिती ज्यांच्या मनात राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवबांचा वाघ आहेस ज्यांचे नाव घेतात सळसळते अंगातील रक्त अशा शिवबांचे आम्ही भक्त संकटावर अशाप्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र होता माझा अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या वेळख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलामरुपी साखळदंडांच्या वेड्यात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरे टोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषण वार होता तो सिंहाचा छवा खेळून गनिमी कावा माजवून रण दुधुंबी रणांगणात खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही बायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केली त्यानं नऊ वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदरी असेल का दुःख यापरी म्हणूनच थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना दिल आव्हान त्यानं डच पोर्तुगीजांना घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून उरला सर्वांना बसून त्यानं दख्खनच्या भूमी हलवल त्यानं दिल्लीचे तक्ख पेटवली रानदान औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी...

आस्ते कदम... आस्ते कदम... आस्ते कदम...

महाराज

गडपती 

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती 

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

राजनिती धुरंदर

प्रौढप्रताप पुरंदर

क्षत्रियकुलावतंस

सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज 

श्री श्री श्री श्रीमंत

छतपती शिवाजी महाराज की जय... ॐ नमो: पार्वती पतेय हर हर महादेव

...




धन्यवाद

आरोही गोरेगावकर 

इयत्ता सातवी

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

Tuesday, September 2, 2025

नशा मुक्त भारत .. देश माझा

   





नशामुक्त भारत 

आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यामध्ये नशेचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे 

 तंबाखू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स ,दारू अशा घातक वस्तूंच्या सेवनामुळे तरुण पिढीचे आरोग्य नष्ट होत आहे .नशेमुळे शरीर कमकुवत होते आयुष्य लहान होते आणि कुटुंबाचे सुख शांती नष्ट होते.

 नशे मुळे शिक्षणात अडथळे येतात तरुण चुकीच्या मार्गावर जातात आणि समाजात गुन्हेगारी वाढते म्हणून भारत सरकारने नशा मुक्त अभियान सुरू केले आहे या अभियानाचे उद्दिष्ट लोकांना व्यसनाच्या धोक्याबद्दल जागरूक करणे आणि सर्वांना मिळून निरोगी व व्यसनमुक्त समाज घडवणे हे आहे

 आपल्या घरापासून नशा विरोधी संदेश द्यायला द्यायला हवा .शाळा महाविद्यालय ,गावागावात व्यसनमुक्ती शिबिरे घेऊन लोकांना प्रबोधन केले पाहिजे.

 तरुण पिढीने खेळ, शिक्षण, कला विज्ञान याकडे लक्ष देऊन जीवन सुंदर घडविले पाहिजे. नशा मुक्त भारत हे स्वप्न आहे जेव्हा प्रत्येक नागरिक व्यसनापासून दूर राहील तेव्हा खरा भारत बलवान निरोगी व प्रगत होईल नशा मुक्त भारत अभियान केवळ सरकारचे काम नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना अमली पदार्थांच्या त्याचे धोके सांगितले पाहिजेत..

रेणुका मल्लाप्पा नायकवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर इयत्ता सहावी

श्रमिकांचे महत्व...

  श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आप...