Sunday, November 16, 2025

श्रमिकांचे महत्व...

 


श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आपले जीवन सुकर व सोपे झाले आहे. आहे . त्यांना जरी त्यांच्या श्रमाचे मूल्य कमी मिळते पण त्यांचे कार्य फारच महत्वाचे आहे.


श्रमिकांची गरज प्रत्येक ठिकाणी असते. शेतीमध्ये, पशुपालनासाठी लहान-मोठ्या कारखान्यांमध्ये. कारखान्यात मजूर नसले तर काहीच उत्पादन होणार नाही .बांधकाम करणारे सुद्धा मजूरच असतात. कालवे, बांधारे, पुल, रस्ते तयार करण्यासाठी मजूर गुंतलेले असतात. घरातली व समाजातील अनेक लहान-मोठी कामे करण्यासाठी श्रमिक झटत असतात.


मजुरांची स्थिती नेह‌मीच चांगली नसते. गावातल्या व खेड्‌यातल्या मजुरांना  त्यांच्या कामाची मजुरी पुरेशा प्रमाणात मिळत नाही.  मोठ्या शहरात त्यांना मजूरी जास्त मिळते पण येथे जगण्यासाठी त्यांना जास्त पैसे खर्च करावे लागतात. शहरातल्या कामगारांना मजुरांना अस्वच्छ वसाहतीत वस्तीत रहावे लागते. आपल्या मुलांना ते चांगले  शिक्षण पण देऊ शकत नाहीत. आजारपणात त्यांना चांगल्या आरोग्याच्या सोयी उपलब्ध होत नाहीत त्यांना इलाजा अभावी  त्रास भोगावा लागतो.


 शासनाने मजुरांच्या कल्याणसाठी काही योजना चालू केल्या आहेत. गावातील मजुरांना गावातच काम मिळेल केली आहे. परंतु इतकेच पुरेसे नाही. सर्व श्रमिकांसाठी घरे , त्यांच्या मुलांचे शिक्षण ,त्यांचे जीवनस्तर उंचावण्यासाठी ठोस कार्यक्रमांची आवश्यकता आहे.  मजुरांच्या श्रमाचा आपण सर्वांनी सन्मान करायला पाहिजे .


 अबोली राम गवळी इयत्ता सातवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रश्नमंजुषा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा ZPPS SUBHASHNAGAR डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्...