शेतकरी नसता तर...
शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. तो दिवसरात्र शेतात घाम गाळून आपल्या पोटासाठी अन्न उगवतो. शेतकरी नसता तर आपण पोटभर अन्न खाऊ शकलो असतो का? नाही! म्हणूनच शेतकरी हा खऱ्या अर्थाने अन्नदाता आहे.
शेतकरी नसता तर शेतात पिके उगवली नसती, धान्य, भाजीपाला, फळे, दूध, कापूस काहीच मिळाले नसते. शहरातील लोकांकडे पैसा असता, पण खाण्यासाठी अन्नच नसते. दुकानांत भाजी, धान्य, फळे यांचा तुटवडा निर्माण झाला असता. भुकेमुळे देशात अराजक निर्माण झाले असते.
शेतकरी आपल्या श्रमाने आपले पोट नव्हे, तर संपूर्ण समाजाचे पोट भरतो. उन्हातान्हात, पावसात, थंडीत तो कष्ट करतो. कधी पिकाला रोग येतो, तर कधी दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे त्याचे नुकसान होते, तरीही तो पुन्हा नव्या आशेने शेती करीत राहतो.
आपण शेतकऱ्यांचा आदर केला पाहिजे. त्यांच्या मेहनतीचे खरे मूल्य ओळखले पाहिजे. शेती हा व्यवसाय नव्हे, तर जीवनाचे सार आहे.
शेतकरी नसता तर आपले जीवन अशक्य झाले असते. म्हणूनच आपण सारे मिळून म्हणूया —
“शेतकरी हा देशाचा अन्नदाता, त्याच्याविना जीवन अशक्य!”.
अबोली गवळी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा.
खूप छान
ReplyDelete