Tuesday, September 9, 2025

छत्रपती शिवाजी महाराज आधारित भाषण

 जगदंब जगदंब जगदंब 

 प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णुर्विश्व वंदिता शहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते... जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पड़ते भल्याभल्यांची मती अरे मरणाची कुणाला भिती ? आदर्श आमचे राजे शिवछत्रपती...


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण?

 छ- छत्तीस हत्तींचे बळ असणारे...

त्र- त्रस्त मुघलांना करणारे...

प- परत माघारी न फिरणारे...

ती- तिन्ही जग जाणणारे...

शी- शिस्तप्रिय...

वा- वाणिज तेज...

जी- जिजाऊंचे पुत्र...

म- महाराष्ट्राची शान...

हा- हार न मानणारे...

रा- राज्याचे हितचिंतक...

ज- जनतेचा राजा...

 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज...

 अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा...

 स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्यांला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही...

 विजयासारखी तलवार चालवून गेला... निधड्या छातीने हिंदुस्तान हरवून गेला... वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला... मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला... स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला... ॐ बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांचे बळ मिळते. एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लहर आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात पेटवली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटवली रानांगणे देह झिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोडो मावळे येते महाराजांवर हसत हसत कुरबान आहेत न चिंता न भिती ज्यांच्या मनात राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवबांचा वाघ आहेस ज्यांचे नाव घेतात सळसळते अंगातील रक्त अशा शिवबांचे आम्ही भक्त संकटावर अशाप्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र होता माझा अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या वेळख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलामरुपी साखळदंडांच्या वेड्यात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरे टोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषण वार होता तो सिंहाचा छवा खेळून गनिमी कावा माजवून रण दुधुंबी रणांगणात खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही बायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केली त्यानं नऊ वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदरी असेल का दुःख यापरी म्हणूनच थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना दिल आव्हान त्यानं डच पोर्तुगीजांना घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून उरला सर्वांना बसून त्यानं दख्खनच्या भूमी हलवल त्यानं दिल्लीचे तक्ख पेटवली रानदान औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी...

आस्ते कदम... आस्ते कदम... आस्ते कदम...

महाराज

गडपती 

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती 

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

राजनिती धुरंदर

प्रौढप्रताप पुरंदर

क्षत्रियकुलावतंस

सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज 

श्री श्री श्री श्रीमंत

छतपती शिवाजी महाराज की जय... ॐ नमो: पार्वती पतेय हर हर महादेव

...




धन्यवाद

आरोही गोरेगावकर 

इयत्ता सातवी

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

Tuesday, September 2, 2025

नशा मुक्त भारत .. देश माझा

   





नशामुक्त भारत 

आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यामध्ये नशेचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे 

 तंबाखू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स ,दारू अशा घातक वस्तूंच्या सेवनामुळे तरुण पिढीचे आरोग्य नष्ट होत आहे .नशेमुळे शरीर कमकुवत होते आयुष्य लहान होते आणि कुटुंबाचे सुख शांती नष्ट होते.

 नशे मुळे शिक्षणात अडथळे येतात तरुण चुकीच्या मार्गावर जातात आणि समाजात गुन्हेगारी वाढते म्हणून भारत सरकारने नशा मुक्त अभियान सुरू केले आहे या अभियानाचे उद्दिष्ट लोकांना व्यसनाच्या धोक्याबद्दल जागरूक करणे आणि सर्वांना मिळून निरोगी व व्यसनमुक्त समाज घडवणे हे आहे

 आपल्या घरापासून नशा विरोधी संदेश द्यायला द्यायला हवा .शाळा महाविद्यालय ,गावागावात व्यसनमुक्ती शिबिरे घेऊन लोकांना प्रबोधन केले पाहिजे.

 तरुण पिढीने खेळ, शिक्षण, कला विज्ञान याकडे लक्ष देऊन जीवन सुंदर घडविले पाहिजे. नशा मुक्त भारत हे स्वप्न आहे जेव्हा प्रत्येक नागरिक व्यसनापासून दूर राहील तेव्हा खरा भारत बलवान निरोगी व प्रगत होईल नशा मुक्त भारत अभियान केवळ सरकारचे काम नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना अमली पदार्थांच्या त्याचे धोके सांगितले पाहिजेत..

रेणुका मल्लाप्पा नायकवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर इयत्ता सहावी

माझी शाळा... लावी लळा

 माझ्या शाळेचे नाव जि. प. प्राथमिक शाळा सुभाषनगर आहे. माझी शाळा एक आदर्श शाळा आहे. माझ्या शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ आणि सुंदर असतो. माझी शाळा माझ्या घरापासून थोड्या अंतरावर आहे.


माझी शाळा पहिली ते सातवीपर्यंत आहे. माझ्या शाळेत जवळपास २०० विदयार्थी शिक्षण घेतात. माझ्या शाळेतील शाळेत सुसज्ज संगणक कक्ष आहे. शाळेसमोर मोठे क्रीडांगण आहे. 


माझ्या शाळेतील शिक्षक खूप प्रेमळ आहेत ,ते आम्हांला खूप छान शिकवतात. आमच्यावर चांगले संस्कार करतात. माझ्या शाळेत वेळोवेळी विविध उपक्रम तसेच स्पर्धा घेतल्या  जातात.


माझी शाळा खेळ तसेच इतर सर्व उपक्रमात नेहमी आघाडीवर असते मी शाळेतील सर्व उपक्रमात सहभागी असते. माझ्या शाळेत सर्व थोर नेत्यांच्या जयंती पुण्यतिथी इ. साजरी केल्या जातात.


मला माझ्या शाळेचा अभिमान वाटतो, कारण माझी शाळा फक्त शिकवण्याचे काम करीत नाही तर आम्हा मुलांवर उत्तम संस्कार करते. मला माझी शाळा माझे दूसरे घर वाटते. मला माझी शाळा खूप आवडते.

रागिनी सुरेंद्र गौतम

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर

 इयत्ता-7 वी

आईसाहेब ..आईचे महत्व

 पोट माझ भराव म्हणून उपाशी ती राही

 झोप मला यावी म्हणून जागी ती राही

 भविष्य माझं घडाव म्हणून... संतत राबत ती राही

 मला कशाशीच भीती नसावी

म्हणून.. माझा पाठीशी खंबीर उभी ती राही

 आई हा अनमोल शब्द आहे. आई या शब्दांमध्ये संपूर्ण विश्व सामावलेले आहे. आई है प्रेम, त्याग व सेवा यांचे खरे प्रतीक आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये आईचे महत्व आहे.


माझी आई सर्वस्व आहे. ती माझी गुरु ,मार्गदर्शक तसेच खरी मैत्रीण आहे. ती दररोज सकाळी लवकर उठते. आमच्या कुटुंबातील सर्वांचेकाळजी घेते. माझी आई माझ्यावर चांगले संस्कार केले,मला चांगले काय आणि वाईट काय हे समजावून सांगते. माझी आई मला फक्त पुस्तकी ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे हे शिकवते.


ती खूप प्रेमळ, कष्टाळू व समजूतदार आहे .मी आजारी असताना ती माझी खूप काळजी घेते. गोरगरीब गरजुनाही ती वेळोवेळी मदत करते. माझी आई मला नेहमी ती माझी प्रेरणा आहे.

आई ही आई असते. दुधावरची साई असते बाहेरून कठोर असते पण


आतून मात्र मऊ असते रागवते पण  ती समजून ही सांगते ती कोनाची दुश्मन नसते ना कोणाची वेरी

सगळ्या साठी तीची माय एकच असते.


संस्कृती संदीप सरगडे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर 

इयत्ता सातवी

अमूल्य वेळ..


वेळ ही अशी एक अमूल्य गोष्ट आहे की जी एकदा गेल्यावर परत येत नसते. गेलेली संपत्ती आपण परत मिळवू शकतो पण गेलेली वेळ परत येत नाही. म्हणूनच संत कबीर म्हणून गेले आहेत  कल करे सो आज कर, आज करे सो अब यासाठी वेळेचे महत्व जाणून माणसाने त्याप्रमाणे वागणे अत्यंत आवश्यक आहे.


रेल्वे जशी कोणासाठी थांबत नाही, ती आपल्या ठराविक वेळेवर सुटतेच, तसेच वेळही कोणासाठी थांबत नाही वेळ एकदाच येत असते. संधी एकाच मिळते. एकदा संधी हातातून  गेली तर पुन्हा येत नसते. तेव्हा वेळचा आपण सदुपयोग करायला हवा. मुलांना टिवल्याबावल्या करीत वेळ घालव‌णे आवडते. त्यांचा वेळ हातातल्या वाळू सारखा सरकत असतो. ते त्यांच्या लक्षात येत नाही. मग परिक्षा जवळ आल्या की ते घाबरतात. "आपला कितीतरी अभ्यास करायचा राहीला आहे. असा पश्चाताप करत बसतात. पण आता त्याचा काहीच फायदा नसतो. कारण अभ्यास करायची वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच वि‌द्यार्थ्यांनी वेळच्या वेळच्या वेळी शाळेत जाणे. वेळी गृहपाठ करणे, योग्य वेळी झोप‌णे, उठणे अशा त-हेची शिस्त स्वतःला लावून घेतली पाहिजे.


वेळेचा योग्य वापर करणे. वेळेचा योग्य वापर करणारे लोकच जीवनात ठरवलेले काही ध्येय प्राप्त काळ शकतात. मुर्ख माणसे आपसात व भांडणात वेळ वाया घालवितात. अश्या लोकांचे आयुष्य व्यर्थ जाते. गेलेली वेळ परत येत नाहीं हे जीवनातले एक सत्य आहे. पंडीत नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले अशी सारी मोठी माणसे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण उपयोगात आणत असत. त्यामुळेच ते जीवनात आपले ध्येय प्राप्त करू शकले.


गेलेले बालपण, गेलेले तारुण्य पुनः परत मिळनार नसते. तेव्हा वेळचे महत्त्व जाणून माणसाने त्याचा सदुपयोग करून सतत कार्यरत राहीले पाहिजे यातच माणसाच्या जीवनाचे सार्थक आहे.



अबोली राम गवळी 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर तालुका कोरेगाव 

इयत्ता सातवी

श्रमिकांचे महत्व...

  श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आप...