Tuesday, September 9, 2025

छत्रपती शिवाजी महाराज आधारित भाषण

 जगदंब जगदंब जगदंब 

 प्रतिपश्चंद्रलेखे व वर्धिष्णुर्विश्व वंदिता शहसुनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते... जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पड़ते भल्याभल्यांची मती अरे मरणाची कुणाला भिती ? आदर्श आमचे राजे शिवछत्रपती...


छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण?

 छ- छत्तीस हत्तींचे बळ असणारे...

त्र- त्रस्त मुघलांना करणारे...

प- परत माघारी न फिरणारे...

ती- तिन्ही जग जाणणारे...

शी- शिस्तप्रिय...

वा- वाणिज तेज...

जी- जिजाऊंचे पुत्र...

म- महाराष्ट्राची शान...

हा- हार न मानणारे...

रा- राज्याचे हितचिंतक...

ज- जनतेचा राजा...

 म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज...

 अशा या महान राजाला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा...

 स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्यांला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही...

 विजयासारखी तलवार चालवून गेला... निधड्या छातीने हिंदुस्तान हरवून गेला... वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला... मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला... स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला... ॐ बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला शंभर वाघांचे बळ मिळते. एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामांची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची त्यांची जात मर्द मराठ्याची देशाला लहर आणली भगव्याची आणि मुहूर्तमेढ रवली स्वराज्याची म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार श्वासात रोखुनी वादळ डोळ्यात पेटवली आग देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ हातात धरली तलवार छातीत भरले पोलाद धन्य धन्य हा महाराष्ट्र धन्य हे आपले महाराज पेटवली रानांगणे देह झिजविला मातीसाठी मरणाच्या दारातही लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी शिवशंभूंची मरूनही हे स्वराज्य राखण्याची साथ आहे म्हणूनच तर लाखो करोडो मावळे येते महाराजांवर हसत हसत कुरबान आहेत न चिंता न भिती ज्यांच्या मनात राजे शिवछत्रपती भगव्या रक्ताची धमक बघ स्वाभिमानाची आग आहे अरे घाबरतोस कुणाला वेड्या तू तर शिवबांचा वाघ आहेस ज्यांचे नाव घेतात सळसळते अंगातील रक्त अशा शिवबांचे आम्ही भक्त संकटावर अशाप्रकारे तुटून पडायचे की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे महाराष्ट्र होता माझा अंधारात औरंगजेब रुपी अजगराच्या वेळख्यात अडकली होती भवानी माता माझी गुलामरुपी साखळदंडांच्या वेड्यात तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म शिवनेरीही झाला धन्य होते त्यांच्यावर जिजाऊंचे संस्कार आणि पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरे टोप व हाती भवानी तलवार घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषण वार होता तो सिंहाचा छवा खेळून गनिमी कावा माजवून रण दुधुंबी रणांगणात खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात जिंकून घेतलं आकाश त्यानं जिंकून घेतलं दुर्ग विशाल सागरालाही बायमान घातलं त्यानं बांधून सिंधुदुर्ग नजर त्याची गरुडापरी पडली सिद्धीच्या जंजिऱ्यावरी केली त्यानं नऊ वेळा स्वारी तरीही पडलं अपयश पदरी असेल का दुःख यापरी म्हणूनच थांबला नाही तो झुकला नाही तो पेटून उठला तो मर्द मराठा भिडला थेट मुघलांना दिल आव्हान त्यानं डच पोर्तुगीजांना घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना शेवटी मराठ्यांचा राजा तो पुरून उरला सर्वांना बसून त्यानं दख्खनच्या भूमी हलवल त्यानं दिल्लीचे तक्ख पेटवली रानदान औरंगजेबाची नाव त्याचं छत्रपती शिवाजी...

आस्ते कदम... आस्ते कदम... आस्ते कदम...

महाराज

गडपती 

गजअश्वपती

भूपती

प्रजापती

सुवर्णरत्नश्रीपती 

अष्टवधानजागृत

अष्टप्रधानवेष्टित

न्यायालंकारमंडित

राजनिती धुरंदर

प्रौढप्रताप पुरंदर

क्षत्रियकुलावतंस

सिंहासनाधिश्वर

महाराजाधिराज 

श्री श्री श्री श्रीमंत

छतपती शिवाजी महाराज की जय... ॐ नमो: पार्वती पतेय हर हर महादेव

...




धन्यवाद

आरोही गोरेगावकर 

इयत्ता सातवी

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर

1 comment:

श्रमिकांचे महत्व...

  श्रमिक किंवा कामगार श्रम करून आपआपली उपजीविका चालवितात त्यांना श्रमिक किंवा मजूर म्हणतात. आज जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात श्रमिकांमुळे आप...