Tuesday, September 2, 2025

नशा मुक्त भारत .. देश माझा

   





नशामुक्त भारत 

आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. त्यामध्ये नशेचे व्यसन ही एक गंभीर समस्या आहे 

 तंबाखू, गुटखा, सिगारेट, ड्रग्स ,दारू अशा घातक वस्तूंच्या सेवनामुळे तरुण पिढीचे आरोग्य नष्ट होत आहे .नशेमुळे शरीर कमकुवत होते आयुष्य लहान होते आणि कुटुंबाचे सुख शांती नष्ट होते.

 नशे मुळे शिक्षणात अडथळे येतात तरुण चुकीच्या मार्गावर जातात आणि समाजात गुन्हेगारी वाढते म्हणून भारत सरकारने नशा मुक्त अभियान सुरू केले आहे या अभियानाचे उद्दिष्ट लोकांना व्यसनाच्या धोक्याबद्दल जागरूक करणे आणि सर्वांना मिळून निरोगी व व्यसनमुक्त समाज घडवणे हे आहे

 आपल्या घरापासून नशा विरोधी संदेश द्यायला द्यायला हवा .शाळा महाविद्यालय ,गावागावात व्यसनमुक्ती शिबिरे घेऊन लोकांना प्रबोधन केले पाहिजे.

 तरुण पिढीने खेळ, शिक्षण, कला विज्ञान याकडे लक्ष देऊन जीवन सुंदर घडविले पाहिजे. नशा मुक्त भारत हे स्वप्न आहे जेव्हा प्रत्येक नागरिक व्यसनापासून दूर राहील तेव्हा खरा भारत बलवान निरोगी व प्रगत होईल नशा मुक्त भारत अभियान केवळ सरकारचे काम नाही तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना अमली पदार्थांच्या त्याचे धोके सांगितले पाहिजेत..

रेणुका मल्लाप्पा नायकवडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुभाषनगर इयत्ता सहावी

2 comments:

  1. खूप छान लेख आहे काळाची गरज आहे..

    ReplyDelete

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष प्रश्नमंजुषा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा ZPPS SUBHASHNAGAR डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नमंजुषा 1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्...